चांगल्या गोष्टी Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एके दिवशी अचानक Marathi Story बादशहाने दरबाऱ्याना तीन प्रश्न विचारले - 'कोणाचा मुलगा सर्वोत्तम आहे ? कोणाचे दात सर्वोत्तम आहे ? कोणाची गुणवत्ता सर्वोत्तम आहे ?
सर्व दरबारी आपापसात विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर चर्चा करायला लागले त्यांच्यातील एक मोठा दरबारी बोलला 'महाराज ! राजाचा मुलगा सर्वोत्तम आहे. हत्तीचे दात सर्वोत्तम आहे. व ज्ञान ही सर्वोत्तम गुणवत्ता आहे.'
अकबरने सर्व उत्तरे ऐकली Marathi Story व विचार करू लागला, जर बिरबल येथे उपस्थित असता तर त्याने मला अधिक योग्य उत्तरे दिली असती. त्याने तात्काळ बिरबलला बोलविणे पाठविले. बिरबल जेव्हा दरबारात आला तेव्हा अकबरने त्याला त्या तीन प्रश्नांची उत्तरे विचारली.
बिरबल उत्तरला, 'महाराज गाईची मुलगा हा सर्वोत्तम आहे. कारण तो आहे की जो जमीन नांगरतो. अगदी त्याचे शेण सुद्धा खत म्हणून उपयोगी पडते. पीक त्याच्यामुळेच उगवते. आणि सर्वांसाठी अन्न तयार होते.'
'दुसरे उत्तर आहे की नांगराचे दात हे सर्वोत्तम आहे. तो जमीन नांगरतो व सुपीक बनवतो. तो आपल्याला पीक वाढविण्यासाठी सक्षम करतो.'
तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना बिरबल बोलला 'महाराज मी सांगू इच्छितो की धैर्य सर्वोत्तम गुणवत्ता आहे. बुद्धिमान व्यक्ती पण धैर्याशिवाय काही करू शकत नाही. जरी ज्ञान ही उत्तम संपत्ती आहे., तरी धैर्य हे महत्त्वाचे आहे.'
अकबर व सर्व दरबारी बिरबलने दिलेल्या प्रश्नांची उत्तरे ऐकूण खूप आनंदी झाले.

Comments
Post a Comment