सर्वोत्तम पाणी Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एक दिवस, अकबरने Marathi Story सर्व दरबाऱ्याना एक प्रश्न विचारला - 'कोणत्या नदीचे पाणी हे सर्वात उत्तम आहे ? '
दरबारातील जास्तीत जास्त लोकांनी एकमताने उत्तर दिले, 'महाराज ! इतर सर्व नद्यांच्या पाण्याच्या तुलनेत गंगा नदीचे पाणी हे सर्वोत्तम पाणी आहे.' परंतु बिरबल शांत होता. हे अकबरने बघितले आणि विचारले,'तू शांत का बसला आहे बिरबल ? तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.'
बिरबल बोलला,'महाराज सर्व Marathi Story नद्यांमध्ये यमुना नदीचे पाणी सर्वोत्तम आहे.' बिर्ब्ल्चे हे उत्तर ऐकूण अकबर चकित झाला. तो बोलला,'बिरबल हे टू काय बोलतो आहे ? तुमच्या धार्मिक पुस्तकात गंगा नदी हि शुद्ध व पवित्र म्हटले आहे, आणि टू यमुनेचे पाणी उत्तम म्हणत आहेत !'
बिरबल म्हणाला, 'महाराज ! मी गंगा नदीच्या पाण्याला अमृत मानतो. त्यामुळे तुम्ही कृपया इतर कोणत्याही पाण्याबरोबर त्याची तुलना करू नका. ते तर अमृत आहे. राहिला प्रश्न नदीच्या पाण्याचा, तर आपल्या राज्याची यमुना नदीच स्वच्छ आहे व त्याचेच पाणी सर्वोत्तम आहे.'
सर्व दरबारी व अकबर अनुत्तरीत झाले व बिरबलच्या उत्तराशी सहमत झाले.

Comments
Post a Comment