गुंता Marathi Story

Marathi Story
एका प्रवासी बोटीला समुद्रात अपघात होतो. त्यामध्ये एक जोडप प्रवास करत असत. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात. त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक Marathi Story आहे. पती पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेऊन जीवनरक्षक बोटीत उडी मारतो ! पत्नी बुडत्या बोटी वर थांबते ! बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकडे पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते ! 

शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, "पत्नी पतीला काय म्हणाली असेल ? बहुतेक विद्यार्थी म्हणतात, मला तुम्ही धोका दिलात ! मी तुम्हाला ओळखण्यात चौक केली !!" एक मुलगा मात्र गप्पच असतो. शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग !" तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटत, ती म्हणाली असेल , मुलांना सांभाळा !" 

शिक्षक चकित होऊन विचारतात "तुला ही गोष्ट माहित आहे का ?" तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो," नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती !"

"तुझे उत्तर बरोबर आहे !" शिक्षक हलकेच म्हणाले. बोट बुडाली. पतीने घरी जाऊन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केले.बऱ्याच वर्षा नंतर, वार्धक्याने त्या इसमाला Marathi Story जेव्हा मरण आले तेव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते. त्यातून असे समजते की तिच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते ! त्या मुळे पतीला स्वतः जीवंत रहाण्यावाचून दुसरा पर्यायच नसतो ! त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, " तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्चा होती ! पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून यावं लागलं !" 

ही गोष्ट आपल्याला सांगते की चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठी , कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही ! 











Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story